Posts

Showing posts from February, 2015

..आम्ही जिवंत प्रेतेच असतो!!

                ..आम्हाला अधिकार नसतोच मुळी..मशाली पेटल्या तरी त्या विझवून टाकायच्या असतात..कधीतरीच प्रेरित होणारे असतो आम्ही..कायमस्वरूपी प्रेरित व्हावं..राहावं.. अस वातावरण भोवती नसतच मुळी.. दिवसेंदिवस आमच्यातला शिवबा.. कर्ण..कृष्ण..दाभोळकर.. पानसरे विचार मारला जातच असतो.चुकून जागा झालेला माणूस पुन्हा झोपवला जातो.. झोपला नाहीच तर थेट यमसदनाला धाडला जातो.संतापाच्या लाटा.. त्वेषाच्या ठिणग्या.. अपमानाची वादळे सारे पुनः पुन्हा शरीरातच दाबून टाकावे लागते.सगळी फक्त घुसळण असते.. वैचारीक.. शरिरिक .. फेकलं जाणं असतं इकडून तिकडे.. जिथे पडू तिथं उकिरडा असला तरी पुन्हा नव्याने उठून मुर्दाडासारखं जगणं आम्हाला मान्य होऊ लागलेलं असतं..आम्ही विसरत चाललेलो असतो स्वतःच माणूसपण..मारण किवा मरण या दोनच गोष्टी जगण्यासाठीच्या कसोट्या बनू लागतात.या दोन गटात आम्ही कधी विभागले जातो आम्हाला कळत पण नाही.एक तर मारा नाहीतर मरा! मग ती तत्व असोत..फार जीवापाड जपलेली मुल्य असोत किवा तुमचा धर्म, जात, संस्कृती, परंपरा यातलं काहीही…हे अपवाद ठरूच शकत नाही.. हळूहळू या सगळ्यातून मान...