Posts

Showing posts with the label आठवणी..

'बी'च किडकं

रायबोराचं झाड होतं समोरच्या शेतात. दरवर्षी बोरं लागायची; पण किडकी. प्रत्येकच बोर किडकं निघायचं. त्या झाडासाठी बरंच काही केलं असं आक्का सांगायची. तरीपण काहीच फरक पडला नाही. बांधावर होती म्हणून की काय पण ती बोर तोडूनही टाकली नव्हती. त्या झाडाच्या थोडं अलीकडं लिंबाचं झाड होतं. त्याच्या लिंबोळ्या गोळा करायचा नाद लागला होता. लिंबोळ्या गोळा करताना बघून आक्का म्हणायची खाशील बिशील. विशारी असतं ते. आक्कानं असं म्हटल्यावर मी त्या गोळा केलेल्या लिंबोळ्या तिथंच टाकून देत असे. गंमत म्हणज त्यातलीे एकपण लिंबोळी किडकी नसायची. डोक्यातून जाता जायची न्हाई ही गोष्ट. माझी समजूत काढायला की काय आक्का म्हणलेली बीच किडकं असल त्या बोरीच म्हणून सगळी बोरं किडत्यात. किडकं बी किडकी बोर. बीच किडकं तर आपण आता काय दुरूस्त करणार असा विचार मनात येऊन अस्वस्थ वाटायचं. आज ती बोर आहे नाही काही माहिती नाही. पण वट्यात गोळ्या केलेल्या लिंबोळ्या आठवतात. बोटात धरून सगळ्या बाजूनं तपासून पाहिलेलं रायबोरही आठवतं. अन बीच किडकं हेही पाठ सोडत नाय. बेसिक गोष्टीतच गोंधळ असला की सगळं गणितच हालतं. बेसिक गोष्ट करप्ट असू नय. बाकी आशावाद ...

'आपण काय करतो आहोत इथे ? ' अर्थात : विंचुर्णीचे धडे

कधी कधी हे ह्रद्य 'नदीत' बदलल्याचा भास होतो तर कधी 'समुद्रात'.. समुद्राच्या पाण्यासारखी त्यात भरती येते .. आेहोटी येते .. लाटा उसळतात.. वादळंही घोंगावतात.. विचार सुरू झाले की हा स...

तोत्तोचान

खरंतर तोत्तोचानबद्दल लिहीण्यासारखं खूप आहे...एक अत्यंत खोडकर, जिज्ञासू, अति उत्साही अशा छोट्या जपानी मुलीची ही कथा..सतत शाळेच्या खिडकीत उभी राहणारी..खिडकीतून रस्त्यावर...