ज्या दिवशी कोसला संपलं त्या दिवशी एकच वाटलं की आपण लय म्हणजे लय म्हणजे लय मुर्ख आहोत . जगातल्या सगळ्या फालतू प्रश्नांना कवटाळून जगतोय . अन ठरवून टाकलं आता पाहिजे तसं जगायचं ! दुनिया गेली ..
कोसला मध्ये असं काहीतरी आहे की जे शब्दांत पकडता येत नाही. अदृश्य असा कैफ चढतो की नंतर सगळंच शून्य वाटायला लागतं. आजवर वाचलं ते कोसला पुढं काहीच नाही आणि इथून पुढे जे वाचलं जाईल ते पण कोसला च्या तोडीच्या अपेक्षेने !
कोसला वाचल्यानंतर समाधान मिळण्याऐवजी अस्वस्थता वाढलीय. मेंदू अजून काहीतरी शोधतोय किंवा मेंदूच्या अपेक्षा अजून वाढल्यात. कोसलाने डोक्याचं वारूळ केलं आणि प्रश्नांच्या मुंग्या सोडल्या .
कोसला प्रत्येक मध्यम वर्गीय मनाचं आणि पांडुरंग प्रत्येक मध्यम वर्गीय तरूणाचं प्रतिनिधित्व करतोय असं वाटलं..
- मुक्काम पोस्ट
कोसला
अविधा
१७ मे २०१५
No comments:
Post a Comment