पावसाळी
आेले रस्ते आणि हा अचानक आलेला प्रत्येक वेळचा पाऊस म्हटलं की कोल्हापूर आठवतंच! पहिल्यांदा कोल्हापूर पाहिलं ते पावसातच.. आणि दुसर्यांदाही.. जेवढं पाहिलं तेवढं ते देखणं वाटलं होतं. शिवाजी विद्यापीठाचा परिसर तितकाच विलोभनीय.. आेल्या मातीवर उमटलेल्या पावलासारखं ते तेव्हापासून मनात रूतून बसलंय. त्या पावलावर बसलेली पुणेरी धूळ अशा पावसात वाहून जाते.. आणि कोल्हापूरच्या आठवणीत रमण्यासाठी मी पुन्हा एकदा मुक्त होते..
Comments
Post a Comment