धावण्याचं रास्त कारण ..
पीक-पाणी, नाती- माती, लग्न - वंश, सगळ्यावरून जोडं खायचं आणि परतीच्या वाटेला लागायचं.. त्याशिवाय महिनाभर काम करण्यात राम घावतंच नाय आपल्याला. कसली आपली जिंदगानी.. जी माती आपल्या करंगळीवर नक्की मुतल का याचा संभ्रम घेत घेत पेला उंचावत पण नुसतं धावायचं. स्थैर्य असं कधी नसतंच पण कुठं..पण आपण मात्र कस्तुरी मृग आहोत ही भावना भिजत ठेवायची मनात. कस्तुरी नका का घावेना पण धावण्यासाठी रास्त कारण तर मिळतं..
Comments
Post a Comment