'.......यारा सीली सीली

काही गाणी काय वेड लावतात ना.. म्हणजे एेकावीशी पण वाटतात..  आणि जगावीशी पण.. मुंबई पुणे मुंबई मधलं ' कधी तू..',
श्री-जानव्हीचं ' नाही कळले कधी..'
राधा आणि घनाचं ' ... तुझ्याविना ' एेकल्यानंतर  (खासकरून सुरूवातीचं आणि शेवटचं ) नाही प्रेमात पडलात पुन्हा तर सांगाच!  मी गाणं डिलीट करीन ☺!!
जगजीतजींची प्रत्येक गझल अशी की  त्यात जाऊन राहावं..
सलील कुलकर्णीचं ' सरीवर सर..' तर आई शपथ!!
मुक्तामधलं ' तू तलम अग्नीची पात ..' पार छापलं गेलंय मनावर..

बाकी पावसाळा जवळ येत आहे. यंदाही आठवणीतच काढायचा असल्याने मी आपली कुमक तयार करीत आहे.........................

'.......यारा सीली सीली
बिरहा की रात का जलना...........'

Comments

Popular posts from this blog

फेणे!

कुणी कुणावर प्रेम करावं, कसं आणि किती करावं...

माणसाला ठार करता येईल; पण त्याची हार नाही करता येणार...