प्रतिबिंब
समोर शांत पाणी दिसलं की आत डोकवून पाहायचा मोह होतोच.. गंमत म्हणजे आपण इतके स्वार्थी असतो की त्या पाण्यात सुद्धा आपल्याला आपलंच प्रतिबिंब दिसावं असंच वाटतं.. आपल्याच त्या प्रतिबिंबाकडं बघून आपण हसतो.. आपल्याच डोळ्यात खोलवर पाहतो.. तिथं सगळं आपल्याला पाहिजे तेच असतं.. मग आपल्याला सवयच लागते स्वतःला असं पाहण्याची.. पण कालांतरानं वादळ येत आणि पाण्यावर तरंग उमटतात.. अजून कालांतरानं पाऊस येतो आणि ती शांतता पुर्णपणे भंग पावते.. पाण्यावर ना ते, सा रे ग म चे सुर उमटत राहतात.. पण अस्वस्थ सुर.. ते हवेसे ही वाटतात पण ते प्रतिबिंब मात्र विचलित झालेलं असतं. इथं त्याची अस्वस्थता समजून घ्यायची असते. त्याला त्याचा मुळ चेहरा दिसेपर्यंत तरी किमान समजून घ्यायचं असतं.. त्याला वास्तव कळेपर्यंत तरी .. त्यानं स्वतःच्या मर्जीनं चेहरा दुर करेपर्यंत तरी .........................
Comments
Post a Comment