Sunday 7 February 2016

थांबण्याची भिती वाटते ..

कुठेतरी पोहोचण्यासाठी कुठूनतरी निघालं पाहिजे म्हणतात पण गेले कित्येक दिवस अशी अवस्थाच अनुभवायला मिळाली नाही..

आता आपल्याला कुठेही जायचं नाही इथेच थांबायचं आहे असा सिग्नल मेंदूला एकदा मिळाला की मेंदूही काम करेनासा होतो. बधीर होणं म्हणजे काय ते समजतं. कामं यंत्रवत पार पाडली जातात.  बौद्धिक, भावनिक, वैचारिक सगळ्याच पातळ्या एकदम खाली येतात.

चौकात उभारलेल्या कायमस्वरूपी (?!) पुतळ्यात आणि आपल्यात नेमका फरक काय हेही कळेनासं होतं..

अशा वावटळी येत राहतात.. धूळ उडत राहते..  अंगाखांद्यावर बसू लागते.. डोक्यावर पक्षी येत जात राहतात.. या सगळ्यात कधी हार-तुर्याचे..  धुळीचे.. मानकरी होतो कळत नाही.

अशा एका रस्त्यावर नुसतेच उभे असतो जो जवळून जात असताना कुठेच नेत नाही. पाय दगडाचे बनतात..

या अवस्थेला स्थितप्रन्यता तरी कसं म्हणावं!? दिवस रात्री समाधी लावल्यासारखी अवस्था!
कित्येक वेळा बर्फ आठवतो..!
कित्येकदा माळावरचे दगड....!!

2 comments:

  1. khup chchan lihita

    ReplyDelete
  2. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1291586050879559&id=100000845308972

    ReplyDelete

बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!

‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...