चाकरमानी

आपण खरे चाकरमानी झालो काय प्रश्न पडू लागलाय.. कारण आॅफिसात डोक्यावर फिरणारा जुनाट पंखा त्याच्या आवाजासहित लक्षात राहू लागलाय. आपण पण असंच फिरत राहतो की.. का न्हाई? एक वाजेपर्यंत वेळ ढकलायची.. भूकच आवरत नाही तर काय.. आणि प्रत्यक्ष डबा उघडून घास तोंडात गेला की तो कसातरी.... त्याचाही कंटाळा येतो.. मग अडीच तीन पर्यंत चहाची वाट बघत बसायचं.. त्याची नेमकी चव कळण्याआधी तो नरड्यातनं खाली उतरवायचा! बसमध्ये धक्काबुक्की करत चढण्याची सवय लागलीय.नकळत! स्वतःच्या अशा कृतीची नंतर किळस वाटते कधीकधी.. स्वारगेट, सारसबाग बस स्टॉप नावाला मागे पुढे केले तरी ताटकळत वाट बघणं आहेच.. साहित्य परिषद ते फुरसुंगी.. संपूर्ण बसप्रवासात काहीतरी भयंकर पाप केल्यासारखं शांत उभं राहायचं.. काही वेळातच आपण मूक बधीर आहोत वाटायला लागतं! आणि गंमत म्हणजे हे वाटणं इथंच संपत नाही तर आपण खरंच काही कामाचे आहोत की ....... फक्त गर्दी आहोत असं वाटू लागतं. रेशनिंगच्या लाईनीत नंबरसाठी एकतर कॅन , दगड नाहीतर आम्हा पोरांना उभं करत असत ते आठवत अशा वेळी.. आपण त्या दगडासारखेच! हितं तिथं उभे राहणारे.. ते लेखकांच्या पाठकोर्या कागदाव बी लिहायची इच्छा होत नाय अलीकडं. आळस नाय पण कसली झिंग पण नाय.. आयुष्य लय सेफ झालंय वाटतं.............................दुसरं  काय ?

Comments

Popular posts from this blog

फेणे!

कुणी कुणावर प्रेम करावं, कसं आणि किती करावं...

माणसाला ठार करता येईल; पण त्याची हार नाही करता येणार...