गावाकडनं फोन आला की ठोके मरणाचे वाढतात. पावसाळा काय सुखाचा जात नाही.. घरचा पत्रा तर उडाला नसल ना वायदळीनं.. दारापुढं वारं अडवणारी झाडं नाहीत म्हणून म्हटलं.. मागच्या भिंती जुन्या आहेत.. पडणार तर नाहीत ना.. गवंड्यानं मुंढरी काय नीट घातली नाय.. सगळं पाणी मुरतं भिंतीत! मागच्या वेळी बाभळ पडली पण नशीब कौलावर पडली नाय.. घरात मांजर आन तिची पिलं होती मागल्या बारीस. डोळं सुद्धा उघडलं नव्हतं त्यांनी .. मोठी झाली असतील आता.. तो उंदीर तुळवीवरून तसाच पळत असंल.. आणि ती पाल खिडकीजवळ तशीच.......
…खरं तर जोडलेल्या असतात या वाटा कुठंतरी एकमेकांशी.. गरज असते त्यांना असं एकमेकांशी जोडलेलं राहण्याची.. एकमेकांकडे पाठ फिरवून जात राहिलो तर या वाटा अशाच हरवत राहतील.. आपला कितीही अट्टाहास असू दे यांपासून दूर जाण्याचा.. पण त्यांना नसेल का ओढ एकत्र येण्याची..?
Subscribe to:
Post Comments (Atom)
बिग ब्रदरचे तुमच्यावर लक्ष आहे!
‘नाईन्टीन एटीफोर’ ही जॉर्ज ऑरवेल यांची आणखी एक जगप्रसिद्ध कादंबरी. मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अन...
-
‘ एका कोळीयाने ’ ही कादंबरी म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘ द ओल्ड मॅन अॅन्ड द सी ’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद होय. सुप्रसिद्ध...
-
सहज आठवत होते... वेळी-अवेळी पाण्याच्या टँकरचा आवाज आला की उठायचो. तेवढं वर्ष जास्तच तापदायक गेलं. पण सवय झालेली. याच्यापेक्षा जास्तीत जास्त...
No comments:
Post a Comment