तो : काय चाललंय? मी : काही नाही. नेहमीचंच. तो : कुठं, ऑफिसमध्येय का आत्ता? मी : हो. तो : बिझी आहेस ना? मी : हो. तो : चांगलंय...... मी : का रे? तो : आरं, बिझी आहेस म्हणजे खुश आहेस! मी : हा... म्हणजे बिझी तर आहे... तो : ऐकून बरं वाटलं. अशीच बिझी राहा... मी : .................................. असा भर दुपारचा त्याचा फोन येतो कवातरी... “आरं, गुरांना खायला नाही. प्यायला पाणी नाही. तुमच्या वस्तीवर तर लय बेक्कार...” तो जे काही म्हणतो, ते चित्र स्पष्ट दिसतं. त्याला काय सांगावं, कळत नाही. “काय चाललंय?” हा प्रश्न तो जितक्या सहजगत्या विचारतो, तोच प्रश्न त्याला विचारताना खूप अवघडल्यासारखं वाटतं. पण तरीही तो मला आठवणीने ‘अशीच बिझी राहा!’ हे म्हणायला विसरत नाही. ‘बिझी राहा’!................... असा निरोप ऐकलाय कधी? मी पहिल्यांदाच ऐकला... हा निरोप आणि निरोप देणारा महत्त्वाचा आहे. एकाच वर्गात शिकलेले आम्ही. मी शहरात निघून आलेय अन् तो गावी शेती करतो. इथं मी बिझी आहे म्हणजे ‘हाताला काम आहे’... काम आहे म्हणजे पोटापाण्याची सोय लागली आहे... थोडक्यात, बेसिक गोष्टींशी चाललेला झगडा तरी किमान संपला आहे. याऊलट त्...
…खरं तर जोडलेल्या असतात या वाटा कुठंतरी एकमेकांशी.. गरज असते त्यांना असं एकमेकांशी जोडलेलं राहण्याची.. एकमेकांकडे पाठ फिरवून जात राहिलो तर या वाटा अशाच हरवत राहतील.. आपला कितीही अट्टाहास असू दे यांपासून दूर जाण्याचा.. पण त्यांना नसेल का ओढ एकत्र येण्याची..?